आता सर्व सामान्यांचे तीन ते चार हजार वाचणार ; राज्यसरकारचा महत्त्वाचा निर्णय काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 पुणे राज्य सरकारच्या महसूल विभागानं मुद्रांक शुल्कात सूट देण्याबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी तसेच राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये दाखल करण्यात येत असलेल्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर यापुढे पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कात सूट असणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे, दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर, विद्यार्थी आणि पालकांना या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांवर एकूण तीन ते चार हजार रुपये यापुढे वाचवता येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर, विद्यार्थी आणि नागरिकांना विविध सरकारी प्रमाणपत्रांसाठी आता पाचशे रुपयांचे स्टॅम्प ड्युटी यापुढे सरकारी कार्यालयात भरायची गरज पडणार नाही.

कोण- कोणत्या प्रमाणपत्रांना असणार सुट ?

जात पडताळणीचे प्रमाणपत्र

उत्पन्नाचा पुरावा

रहिवासी प्रमाणपत्र

नॉन-क्रीमीलेयरचे प्रमाणपत्र

राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्रासह

सरकारी कार्यालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवरती यापुढे पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कात सूट असणार आहे.

राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या या निर्णयामुळे, लाखो विद्यार्थ्यांना तसेच कोट्यवधी नागरिकांना हा सर्वात मोठा दिलासा असणार आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे, साध्या कागदावर स्व:ता प्रमाणित केलेला अर्ज लिहून सर्व तहसील कार्यालयांमधून हि मुद्रांक शुल्कात सुट दिलेली प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर, विद्यार्थी आणि पालकांना या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांवर होणाऱ्या खर्चावर एकूण तीन ते चार हजार रुपये वाचवता येणार आहेत. सध्या राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या वतीने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधीत कार्यालयांना देण्यात आले आहेत. सरकारकडून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत लाखो विद्यार्थी तसेच करोडो नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें