जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर:- हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे यांच्या प्रमुखउपस्थितीत इंदापूर विधानसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी तुफान फटकेबाजी करताना आमदार दत्तात्रय मामा भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. मलिदा गँग हटाओ इंदापूर बचाओ कार्यकर्त्यांचा नारा असल्याचा हर्षवर्धन पाटील यांनी टोला लगावला आहे. उद्याच्या विधानसभेतील निवणूक किती रंगी आहे माहित नाही, पण तुतारीमय आहे हे नक्की. तुतारी महाराष्ट्राच्या विधानभवनात वाजणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखवला. प्रशासन चालवण्यासाठी चांगली माणसं लागतात. म्हणून पवार साहेबांनी माझा विचार केला असेल. याचा अर्थ उमेदवारी मागणारी कमी आहेत असं नाही, असेही यावेळी ते म्हणाले आहेत.
उजनी धरणावर पूल करा अशी कोणाची मागणी होती का? ते ४०० कोटी उजनीच्या बुडीत बंधाऱ्यासाठी खर्च केले असते तर चार हजार कोटींचे उत्पन्न या माझ्या शेतकऱ्याने घेतले असते. त्यांनी सांगितले की, लाडकी बहिण योजना स्थगित करण्यात येत आहे निवडणूक आयोगाने आदेश काढला. ११२ जीआर निवडणूक आयोगाने रद्द केले. एक मंत्री म्हणतो लाडकी बहिण आम्हाला वाचविणार आमची मते वाढतील. २० तारखेला मतदान २३ तारखेला निकाल आणि ३१ तारखेपर्यंत पैसे विषय संपला, अशी टीका त्यांनी यावेळी केली. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजना चालू करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
कोणी साड्या वाटल्या? कोणी तेलाचा डबा वाटला?
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महा विकास आघाडीकडून अर्ज दाखल केल्यानंतर आपला आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. आम्ही तालुक्यात गुंडगिरी वाढू दिली नाही. आज दहा वर्षात तालुक्यात काय चाललं आहे? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले राज्यात विस्कटलेली घडी पुन्हा बसवायचे असेल, तर जनतेच्या मनातील रयतेचे राज्य आणायचं असेल तर परिवर्तन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी पुढे सांगितले की आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, पण कोणी साड्या वाटल्या का? तेलाचा डबा वाटला का? मग आज वेळ का आली? अशी विचारणा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केली आहे.
ते पुढे म्हणाले की,एका पत्रकाराने महिलांनी फेकून दिलेल्या साड्या म्हणून बातमी लावली म्हणून त्याला धमकी दिली गेली. त्या धमकी देणारा मागे कोण आहे? त्या धमकी देणाऱ्यांचा जाहीर निषेध असल्याचे ते म्हणाले आहेत. एवढी मस्ती आणि दादागिरी तुमच्यात का आली? ती उतरवल्या शिवाय आम्ही राहणार नाही. इंदापूर तालुक्याचा बिहार होऊ द्यायचा नसेल, तर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या समोरील बटन दाबा. ग्रामपंचायत निवडणूकी पेक्षा अधिक ताकदीने काम करा. तसेच आपण २४ दिवस जीवाचे रान करा, पुढील पाच वर्ष तुम्हा सर्वांची जबाबदारी ही हर्षवर्धन पाटलाची आसेल असे यावेळी बोलताना पाटील म्हणाले आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह