१९ वर्षानंतर एकत्र येत,विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा ….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूरः (दि.५) इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील २००६ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी येथे संपन्न झाला. गेल्या १९ वर्षा नंतर एकत्र येत मित्र मैत्रीनींनी आपल्या बालपनाच्या आठवनींना यावेळी उजाळा दिला.
सकाळी १० वाजता या स्नेह मेळाव्यास सुरुवात झाली. म्हसोबाचीवाडी या शाळेतील कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणचे वर्गमित्र एकत्र आल्याने आनंदीत झाले. १९ वर्षानंतर पुन्हा शाळा भरल्याचा अनुभव या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांना अनुभवास आला. या भेटीत अनेक वर्गमित्र अतिशय भारावले होते. २००६ ची इ.१० वी ची बॅच एकत्र आणण्यासाठी प्रशांत माने यांनी पुढाकार घेऊन २०१७ साली व्हाट्सअप ग्रुप बनवून त्यामध्ये मित्र-मैत्रिणींचे नंबर ॲड केले. त्यानंतर या केलेल्या प्रयत्नांमुळेच तब्बल ८ वर्षांनी हा स्नेह मेळावा सफल झाल्याचे यावेळी माने याने जनसंघर्ष न्यूजला बोलताना सांगितले . या कार्यक्रमाला वर्गमित्र, वर्गमैत्रिणी व सेवानिवृत्त शिक्षक आणि विद्यमान शिक्षक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी सुमधुर गाण्यावर बेधुंद होऊन विद्यार्थ्यांसह शिक्षक ही थिरकल्याचे पाहवयास मिळाले. तसेच संपूर्ण दिवसभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २००६ -०७ च्या इ.१० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.
यामध्ये गाण्याच्या भेंड्या , रांगोळी काढणे , शिक्षकांचे स्वागत , भुतकाळातील गप्पा, आणि प्रत्येकाचा परिचय इत्यादी कार्यक्रम यावेळी पार पडले त्यानंतर सर्वांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शाळेच्या जीर्णोद्धार साठी मदत स्वरूपात २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
               मुख्याध्यापकांना धनादेश देताना विद्यार्थी.
या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक महादेव वणवे सर ,भोंग सर, मारुती वनवे सर, मिसाळ सर,बागल सर, भुजबळ , आणि विद्यमान शिक्षक वर्ग इत्यादी जण उपस्थित होते. तसेच २००६-०७ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी , सागर चांदगुडे, अतुल चांदगुडे, अजित पवार, प्रशांत माने, अंकुश माने,मिरा धवडे, महेश चांदगुडे, आशा साळुंखे , अमोल पवार, गणेश दाभाडे, नितिन दाभाडे, सुनिता चांदगुडे, रेश्मा आव्हाळे,रोहीनी काळे, प्रियंका चांदगुडे, ज्योती पवार , नितीन पवार, आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बागल सरांनी केले तसेच हा स्नेहमेळावा यशस्वी होण्यामागे प्रशांत माने व इतर विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान ठरले.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai